एरंगळ किल्ला
दाना पाणी बीच
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : मुंबई
या किल्लाचा फक्त एक बुरुज शिल्लक राहिला आहे.
पश्चिम रेल्वेवर असलेल्या एरंगळ समुद्रकिनारा मुंबईकरांना चांगलाच परीचीत आहे. एरंगळ गाव मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला सुमारे बारा किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी वसलेलं आहे.
पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकणातील प्रदेशात या परिसराचा समावेश होत होता. हा परिसरराठी भाषेत फिरंगाण या नावाने ओळखला जात असे.
फिरंगाणातील बहुसंख्य किल्ले हे पोर्तुगीजांनी उभारलेले
आहेत. या किल्ल्यांची काही खास स्थापत्यशैली होती.
फिरंगाणाचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन
होते तेच साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एका
बुरुजांची तर काही ठिकाणी चौक्यांची योजना
पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते. एरंगळ गावाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी या बुरूजाची निर्मिती केली होती. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. साधारणतः १६व्या शतकात मढ भागातील ईतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर
कोकणात आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातुन उच्चाटन झाले.



