{ महाराष्ट्रातील गड किल्ले } इतिहासाच्या या साक्षीदारांच्या सोबतीने चला पाहुया आज शिवबा ते छत्रपती शिवराय.भाग १
शिवरायांच्या जन्मापासून म्हणजे किल्ले शिवनेरीपासून त्यांच्या निधनापर्यंत म्हणजेच किल्ले रायगडापर्यंत शिवरायांच्या कारकिर्दीत महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या किल्ल्यांच्या इतिहासाची सचित्र माहिती असलेली मालिका.
" राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा" असा हा "महाराष्ट्र" दुर्गांचा देश. यातील बहुतेक दुर्गांनी श्री शिवछत्रपतींची चरणधूळ मस्तकी धारण केली आहे. जेथे शिवनेरी किल्ल्याने स्वराज्याचा सूर्योदय पाहिला तेथेच रायगडाने या तेजस्वी सुर्याचा अस्त होताना पाहिला. ज्या भूमीने तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधलेले पाहिले, रायगडावर शिवराज्याभिषेक पाहिला त्याच भूमीने तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे अशा कैक विरांना स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले पाहिले. सह्याद्रीत कोठेही उभे राहून नजर फिरवली असता चार-दोन शिखराआड एखादं शिखर तटा-बुरुजांचा शेला-पागोटं चढवून उभा राहिलेला आढळतो.
इतिहासाच्या या साक्षीदारांच्या सोबतीने चला पाहुया आज शिवबा ते छत्रपती शिवराय.
No comments:
Post a Comment