
Followers
Wednesday, 27 May 2020
शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग 2

शिवरायांच्या अभिनव दुर्गशास्त्रातील प्रयोग भाग १
महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व भाग 3

महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व भाग 2
महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व भाग १
महाराष्ट्राचे दुर्गवैभव :संक्षिप्त इतिहास व महत्व
भाग १
लेखनसिमा.
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
राकट देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!"
ह्या प्रसिद्ध अशा कवितेतील ओळीतून गोविंदाग्रजांनी अतिशय समर्पकपणे
सह्याद्री आणि महाराष्ट्राचे वर्णन केले आहे.'राकट देशा दगडांच्या देशा' ही
वरील उपमा सह्याद्रीला आणि सह्याद्रीत राहणाऱ्या मावळ्यांना लागू होते.
तसं पाहिलं तर त्या त्या भागातील भूगोलाचा आणि नैसर्गिक जैवविविधतेचा
त्या त्या भागातील इतिहासाशी परस्पर संबंध असतो. ह्याच भौगोलिक
परिस्थितीमुळे त्या भागातील स्वभाव वैशिष्ट्य ठरते. त्यामुळेच राकट
दगडांचा असलेला हा महाराष्ट्र देश राकट, कणखर, चिवट स्वभावाच्या लोकांचा
आहे.
ह्या महाराष्ट्राच्या खोलात दडलाय हा इतिहास. जवळजवळ दोन हजार
वर्षांचा इतिहास आहे हा आणि ह्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर
गडकिल्ले ह्यासारखे दुसरे विश्वासाचे साधन नाही.
ह्या पवित्र भूमीतील
सर्वांत जुने शासक म्हणजेच सातवाहन किंवा त्यांस दक्षिणापथवती सातवाहन असे
सुद्धा म्हटले जाते. सातवाहन घराण्याने जवळ जवळ 500 वर्षे महाराष्ट्रावर
राज्य केले. ह्या दरम्यान महाराष्ट्राला आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक
स्थैर्य सातवाहन कालीन पराक्रमी राजांनी दिले.
तिसऱ्या शतकाच्या
मध्यावर वाकाटकांचे राज्य विदर्भात आले. जवळ जवळ 250 वर्षे हे राज्य
टिकले. इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या सुरुवातीला चालुक्य घराण्याचा उदय
झाला.चालुक्यांचा पराभव करून राष्ट्रकूटांनी त्यांची 200 वर्षांची सत्ता
संपुष्ठात आणली. राष्ट्रकूटांनी 8 व्या शतकापासून ते 9 व्या शतकाच्या
मध्यापर्यंत राज्य केले.
साधारण 8 व्या शतकात महाराष्ट्रातील काही
पश्चिम भागावर शिलाहार वंशीय घराण्याचे राज्य होते. हे शिलाहार राज्य तीन
भागात विभागले होते. त्यापैकी पहिली शाखा मुंबई, रायगड आणि ठाणे हे
जिल्हे तर दुसरी शाखा रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा यांची राजधानी
वलीपट्टण म्हणजेच रत्नागिरी येथील खारेपाटण आणि तिसरी शाखा सातारा,
कऱ्हाड, कोल्हापूर आणि बेळगाव त्यांची राजधानी वडिवळे म्हणजे राधानगरी ही
होय. पन्हाळा हा किल्ला शिलाहार वंशीय राजांनी बांधला आहे.![]()
दुर्गांची प्रमुख अंगे भाग 5
दुर्गांची प्रमुख अंगे
भाग 5
लेखनसिमा.....
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
🚩किल्ल्याचे द्वार व प्रकार 🚩
आता जर एखादा किल्ला स्थलदुर्ग किंवा राजधानीचा असेल तर खालील गोष्टींचा सुद्धा बांधकाम करताना विचार केला जातो.
तट बांधून झाल्यावर पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर सम प्रमाणात रस्ते आखून एका चौकात मिळतील अशी योजना केली जाते. नगरातील सामान्य रस्ते 15 फुटी तर राजमार्ग, छावणीकडे जाण्याचा मार्ग, बाजार मार्ग 20 फुटी असतात. बाजार हा उंच ओट्यावर असावा म्हणजे एखादा शिलेदार घोड्यावर बसून खरीदारी करू शकेन. उदा.रायगडवरील बाजार. होम हवन आणि मंदिरासाठी शांत जंगलयुक्त जागा निवडावी. राजवाडा हा किल्ल्यातील मध्यभागी असावा, राजाच्या अष्टप्रधान मंत्र्यांचे वाडे राजवाड्याशेजारी असावेत.
कारभाऱ्यांनी घरे त्यांच्या हुद्दयानुसार असावीत.
तर अशा प्रकारे किल्ल्यातील महत्वाची बांधकामे कशी असावीत आणि शास्त्रात उल्लेख केलेले प्रकार येथे सांगितले.
याव्यतिरिक्त महाभारतीय ग्रंथात किल्ल्यात आवश्यक सामग्री कोणत्या प्रकारची असावी याचे संक्षिप्त वर्णन पुढील प्रमाणे
*किल्ल्यात उत्कृष्ट कारागिरांचे वास्तव्य असावे
*धनधान्याचा विपुल साठा असावा. उदा : शिवनेरी किल्ल्याला जॉन फ्रॉयर याने 1676 ला भेट दिली होती. त्यावेळी त्याने असे लिहून ठेवले कि 1000 लोकांना 7 वर्षे पुरेल इतके धान्य इथल्या अंबरखान्यात आहे.
* अठरा कारखाने 12 महाल आणि बाजारबुणगे असावेत.
* सर्वप्रकारच्या धातूंचा संचय असावा.
* सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतीची साठवणूक असावी.
* सडलेल्या तुपाच्या विहिरींची सोय असावी .
* तलाव, पाण्याचा विपुल साठा असावा .
* प्रकांड पंडित आणि ज्ञानी लोकांचा भरणा
असावा.
* भिकारी, कुचकामी, व्यसनी लोकं नसावीत.
* सर्वांत महत्वाचे किल्ल्यासारखीच भक्कम, शूर-वीर आणि अभेद्य माणसे तयार करावीत कारण किल्ला लढवता येतो त्या किल्ल्यातील भक्कम मनाच्या माणसांमुळेच.
दुर्गांची प्रमुख अंगे भाग 4
दुर्गांची प्रमुख अंगे
भाग 4
लेखनसिमा.....
श्री शिवसेवेशी तत्पर
तुषार भोर निरंतर.
अध्यक्ष
सखा सह्याद्री गिर्यारोहक
पुणे.
🚩किल्ल्याचे द्वार व प्रकार 🚩
दुर्गसुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे द्वार. प्रामुख्याने द्वाराचे अनेक प्रकार पडतात. महादरवाजा, बिनीचा दरवाजा, चोर दरवाजा, हत्ती दरवाजा इत्यादी.यात हत्ती दरवाजा आणि महादरवाज्याची उंची भरपूर असते.जवळजवळ राजा हत्तीवरील अंबारीत बसून प्रवेश करू शकेल इतक्या उंचीचा महादरवाजा बनवलेला असतो.
किल्ल्यावर असलेल्या द्वाराच्या संख्येवर किल्ल्याची संरक्षण व्यवस्था अवलंबून असते. उदा. शिवनेरी किल्ल्यावरील सात वेगवेगळ्या दरवाजांमुळे हा किल्ला लढाईच्या दृष्टीने अभेद्य बनला आहे. द्वाराचे बांधकाम करताना जी शिला वापरली जाते प्रामुख्याने तिचे उपयोगितेच्या तसेच गुणधर्माच्या दृष्टीने तीन प्रकार पडतात. प्रथम पुंशीला, ही शीला अतिशय टणकअसते व यापासून बनवलेले द्वार हे सर्वात जास्त टिकणारे असते जवळ-जवळ ह्या शीलेपासून बनवलेले महाद्वार टिकाऊ असतें आणि सहजा सहजी पडत नाही . पाषाणावर पाषाण आपटल्यावर घंटे सारखा नाद जर त्या शिळेतून आल्यास त्यांस 'पुंशीला' म्हणतात. द्वितीय प्रकारास 'स्त्रीशिला' असे म्हणतात हिच्या पाषाणातून सामान्य पाषाणासारखा आवाज येतो. तिसऱ्या प्रकारच्या शिळा म्हणजे नपुंसक शिळा . ह्या शिळेच्या पाषाणातून कास्यासारखा आवाज येतो .त्यांस 'नपुंसक शिळा' असे म्हणतात. तर अशा प्रकारच्या शिळांचा वापर करून पूर्वीचे महाद्वार बांधले जायचे. महाद्वारावर वेगवेगळी चित्रे अथवा शिल्प कोरलेली असतात. यांत शत्रूला भय वाटावे म्हणून भद्रमुख कोरण्यात येई तर काही ठिकाणी द्वारांवर गजान्त लक्ष्मी काही ठिकाणी सिंह तर काही ठिकाणी व्याघ्रेश्वर कोरण्यात येई कारण द्वारावर कोरण्यात येणाऱ्या नक्षी वरून तो किल्ला कुठल्या राजाने अथवा कुठल्या काळात बांधला याचा अचूक अंदाज येतो.
किल्ल्याचे द्वार हे संध्याकाळी सूर्यास्ताला बंद करून सकाळी सूर्योदयाला उघडतात. तसें पहिले तर प्रत्येक द्वाराचे स्वतंत्र कार्य अथवा उपयोग असतो. उदा. चोर दरवाजा अथवा गुप्त द्वाराचा उपयोग संकटं काळी अथवा गुप्तहेर करतात. बिनीचा दरवाजा वर बिनीची म्हणजेच आघाडीची पथके ठेवलेली असतात तसेच किल्ल्यावरील महत्वाचा दरवाजा म्हणून त्यांस ओळखतात.