Followers

Monday 22 June 2020

विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ला.

दुर्ग क्रमांक : ३.
विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ला.

#छत्रपती_शिवरायांच्या_झुंजाराची_रीत...
#विश्रामगड_ʼपट्टाकिल्लेʼ.
इ.स २२ नोव्हेंबर १६७९ रोजी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पट्टा किल्ल्याची हिंदवी स्वराज्याच्या सुवर्ण इतिहासात नोंद झाली आणि हर हर महादेव गर्जनेत “विश्रामगड गाथा” सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात रुजली...
या ऐतिहासिक पर्वाची साक्ष देणारा पट्टाकिल्ला...

इ स १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली सोनेनाणे, जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले दरम्यान महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची अशी रणनीती निश्चित करण्यात आली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्याकडे रवाना झाले संगमनेर जवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २२ नोव्हेंबर इ स १६७९ या दिवशी नगर-नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणार्या अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ल्या वर आले त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर ‘विश्रामगड’ असे पडले...

आभार :
● छत्रपती फाउंडेशन, भिगवण.
● विश्रामगड (पट्टाकिल्ला)
● गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.
● पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र राज्य.

No comments:

Post a Comment