Followers

Tuesday 26 January 2021

पवनी शहरातील ऐतिहासिक घाट, भंडारा

 

#VidarbhaDarshan -





पवनी शहरातील ऐतिहासिक घाट, भंडारा
दोन हजार वर्षापूर्वीचे धार्मिक, ऐतिहासिक व प्राचीन पद्मावतीनगर म्हणजेच आजचे पवनी शहर होय. येथील शेकडो मंदिरे, अभेद्य परकोट, गरूड खांब, सम्राट अशोककालीन बौद्धस्तूप या नगराच्या भव्यदिव्यतेची व संपन्नतेची साक्ष देतात. या वैभवशाली वारशात भर पाडणारे वैनगंगा नदीकाठावरील इतिहासकालीन सहा घाट आज मात्र आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. पवनी नगरावर मौर्य, शुंग, सातवाहन, सिथीयन, वाकारक, गोंडराजे, भोसले राज्यांनी राज्य केले, त्यामुळे नेमक्या कोगत्या राजाच्या कालखंडात या घाटांचे बांधकाम झाले हे सांगणे कठीण आहे. नगरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या दक्षिण काटावर वैजेश्वर घाट, पाटे घाट, ताराबाईचा घाट, घोडेघाट, पान खिडकी घाट, दिवाण घाट पवनीच्या इतिहासाची साक्ष देतात .
रुपेरी वाळू अन् शंख - शिंपले असलेला पवनीचा परिसर फक्त घोडेघाटावरच आहे. घोडेघाट हा अतिशय छोटा आहे. या पारावर आजही गावातील लोक आपल्या घरची जनावरे अंघोळीसाठी नेतात. लहान मुलेसुद्धा अंघोळीसह वाळूच्या गालिच्यावर खेळण्याचा, शंख - शिंपले वेचण्याचा आनंद लुटतात. घाटांच्या ठराविक अंतरावर बुरूज बांधले आहेत. पोहणारे त्या उंच बुरुजावर चवून वरून नदीत उडी मारुन पोहण्याचा आनंद घेतात.
दिवान घाट, पान खिडकी घाट दुर्लक्षित
पान खिडकी घाट दुर्गा मंदिराजवळ आहे. या घाटावर राजा, राणी स्नान करायचे अशी आख्यायिका आहे. येथेच एक शिवलिंग (पिंड) आहे. नदीच्या पुलाच्या पलिकडे हत्तीच्या आकाराचा दगड (गोटा) आहे. त्याला हत्तीगोटा असे म्हटले जाते. पान खिडकीकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या सम्पूर्णतः जीर्णावस्थेत आहेत. जाण्याचा मार्गावर दगड पडले आहेत.
भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच पायऱ्यांवरून जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु कालौघात या घाटाच्या वैभवाला उतरती कळा लागली आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजसुद्धा ढासळले आहेत.एका दरवाज्याची भिंत पडली असून तेथे झाडे झुडपे वाढलीत. त्यामुळे हा दरवाजा बंद आहे. सद्या ही जागा माध्यपींसाठी मेजवानीचे ठिकाण बनले आहे.
आरक्षित घाट
राजमहाराजांच्या काळात समाजातील विविध जाती, वर्गाच्या लोकांसाठी तसेच प्राण्यांसाठी देखील नदीघाट आरक्षित होते. यातील अनेक घाट आजही सुस्थितीत आहेत. तर काहींची पडझड झाली आहे. घोड्यांना पाणी पिण्यासाठी घोडेघाट, राज्यातील दिवाणासाठी दिवाण घाट होते. फक्त पाटेघाटावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाते.
वैजेश्वर घाट
वैजेश्वर घाटाला धार्मिक महत्व आहे. या घाटावर नदीपात्रात असे एक ठिकाण आहे. जिथे बेलाचे पान टाकल्यानंतर ते तळाशी जाते आणि इतरत्र टाकले तर तरंगत राहते. येथे वैजेश्वर महादेव व बारा ज्योर्तिलिंगाच्या प्रतिमा असणारे मंदिर आहे. याच घाटावर विदर्भातील विविध ठिकाणाहून लोक अस्थिविसर्जनासाठी येतात, तसेच येथे दशक्रिया केली जाते.
ऋषीपंचमीच्या स्नानाचे महात्म्य
वैजेश्वर घाटाला लागूनच ताराबाईचा घाट आहे. या ठिकाणी पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे. ऋषोपंचमीच्या दिवशी नागपूर, भडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हयातून अनेक स्त्रियाः स्नानाकरिता वैजेश्वर मंदिरालगतच्या वैजेश्वर घार, ताराबाईचा घाटांवर येतात. नदीत पवित्र स्नान, पूजाविधी व स्वयंपाक करून ऋषीपंचमीच्या व्रताची सांगता करतात. कार्तिकी पौणिमेला रात्रीला वैजेश्वर , ताराबाईच्या घाटावरून नदीपात्रात दिवे सोडले जातात. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने हा घाट उजळून निघतो. हे दृश्य मनोहारी आणि नयनरम्य असते. जणू आकाशातौल लुकलुकणारे चांदणेच नदीत अवतरल्याचा भास होतो. श्री वासुदेवानंद सरस्वती यानी त्यांच्या पवनी वास्तव्यादरम्यान येथील वैनगंगा नदीवर 'वैन्यास्तोत्र' रचले. ते दत्तमंदिर परिसरातील पान खिडकीच्या घाटावर दररोजस्नानाला जात.
पुनरुज्जीवन व सौदर्याकरण अपेक्षित
पवनी हे प्राचीन ऐतिहासिक शहर आहे. येथील वैभव पाहण्यासाठी पर्यटक व इतिहासप्रेमी येतात. पुरातत्वविद व इतिहास संशोधकांनीसुद्धा येथे अभ्यास व संशोधन केले आहे. त्यातून या नगराची गरीमा व महत्व अधोरेखित करणाऱ्या अनेक चाबी समोर आल्या. परंतु, लोकप्रतिनिधी, प्रशासनाला या गोष्टीचे महत्व अधापही उमगलेले नाही. काळाच्या ओघात नष्ट होऊ पाहणारे, दृष्टीआड होणारे हे वैभव जपण्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन, सौदयीकरण व विकासकामे होने अनिवार्य आहे.
माहिती व प्रतिमा साभार- नितेश बावनकर (पवनी)
संकलन- डिजिटल भंडारा

No comments:

Post a Comment