Followers

Saturday 19 December 2020

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातले ऐतिहासिक गावाला “किल्ला वैरागड”

 


गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातले ऐतिहासिक गावाला “किल्ला वैरागड”....🚩

येथे गोंड राजा विराट याची राजधानी असलेला वैरागड किल्ला आहे..१५ व्या शतकापासून उन वारा पाऊस झेलत शेवटच्या घटका मोजत असलेली तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वैरागड...
१५ व्या शतकात चंद्रपूरचा गोंडराजा बल्हाळशहाने वैरागडचा किल्ला बांधला पूर्वी वैरागडला हिऱ्याची खाण होती हिऱ्याच्या खाणीच्या संरक्षणार्थ राजा बल्हाळशहाने हा किल्ला बांधला हिऱ्याच्या खाणीची लूट करण्यासाठी मुस्लीम राज्याच्या स्वाऱ्या होत असत पुढे हिऱ्याच्या खाणीचे काम बंद पडले आणि पुढे बल्हाळशहाने आपल्या उत्तरार्ध सैन्य काढून घेतले तेव्हापासून हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे...
वैरागडच्या पूर्वेला नागवंशीय आदीम माना जमातीचा धर्मशील पराक्रमी राजा कुरूम प्रहोद आणि वैरागड येथील गोरजाईचे मंदिर बांधले सध्या हे मंदिर भग्नावस्थेत आहे माना समाज बांधवांचे कूलदैवत आहे...
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : गडचिरोली टुरिझम...♥️

No comments:

Post a Comment