Followers

Wednesday 24 March 2021

२० मार्च १६६९ नखलचा किल्ला...

 


२० मार्च १६६९ नखलचा किल्ला...
हा किल्ला मस्कत ह्या राजधानीपासून १२० किलोमीटर अंतरावर आहे.. हा किल्ला “सल्तनत ऑफ ओमान” ह्या देशात असून “अल बतिनाह” भागातील सर्वात महत्वाचा किल्ला आहे...
किल्ल्यात सुंदर संग्रहालय असून ते 'मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चर' कडून चालविले जाते ह्या किल्ल्याला आजून एक नाव आहे 'ह्यूसन अल हिम' ह्या किल्ल्याचा इतिहास पूर्व-इस्लामिक कालखंडातील आहे हा किल्ला अत्यंत प्राचीन असून इतिहासकारांच्या मते हा साधारण १५०० वर्षांपूर्वीचा आहे...
ह्या किल्ल्याचे 'नखल' हे नाव तिथे असणाऱ्या नखल ह्या प्राचीन गावावरून पडले आहे शतकानुशतके ओमान मधील बऱ्याच शासकांनी किल्याचा विस्तार आणी नुतनीकरण केले किल्यात सुधारणा केल्याची सर्वात जुनी नोंद हि ९ व्या शतकातील आहे ती सुधारणा इमाम सलत बिन मलिक अल खसुरी ह्यांनी केली किल्ल्याचा आजून विस्तार हा तेथील यामादि, नभानी, आणी यरुबी ह्या जमातींनी (tribe) केला १७ व्या शतकात ह्या किल्याचे बरेच पुनर्वसन झाले...
निझवा ह्या प्रादेशिक राजधानी पासून जवळच्या व्यापार मार्गांसाठी संरक्षणात्मक उपाय म्हणून ह्या किल्याचा वापर केला गेला वादी बनी खारुस चे इमाम (धर्म गुरु ह्यांचं मोठं वर्चस्व असायचं) आणी यराबा वंशाचे इमाम ह्या किल्ल्यात राहत होते नखल किल्ल्यातील सर्वात अद्वितीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे तो एकसमान आकाराचा नाही किल्ल्याचे बांधकाम हे उंच अश्या खडकांवर असल्याने किल्ल्यात बरेच चढ उतार आहेत ह्या उंच खडकांमुळे किल्ल्याची भव्यता छान दिसते किल्यात बरीच बांधकाम असून त्यात प्रामुख्याने एक मशीद, एक विहीर किल्लेदाराची कोठी, महिलांच्या राहायच्या खोल्या लहान मुलांच्या खोल्या, सैनिकांसाठीच्या खोल्या, किल्ल्यातील दरबाराची कोठी, आन धान्य साठवायचा खोल्या आणी कैद्यांचे तुरुंग असे अनेक प्रकार आहेत...
“छत्रपती शिवाजी महाराज” आणि ओमानचे संबंध :
ह्याच नखल किल्ल्याचे इमाम ‘सुलतान बिन सैफ’ ह्यांनी पोर्तुगिजांचा बिमोड करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत घेऊन आपल्याकडे मस्कतवरून अरबी आरमार पाठविले होते...
मुंबईकर इंग्रज सुरतेला २० मार्च १६६९ ला पत्र लिहितात कि.., “मस्कतहून ताजी बातमी अशी आली आहे कि १९ मोठी आणि ५-६ छोटी मिळून ४००० लोक असलेले एक अरबी आरमार हिंदुस्तानच्या किनाऱ्याकडे निघून गेले काहींच्या मते हे आरमार शिवाजीराजास मदत करण्याकरीता म्हणून जात असावे...”
मुंबईकर इंग्रज सुरतेला परत ९ फेब्रुवारी १६७४ ला पत्र पाठवितात कि: “अशी दाट बातमी आहे कि ओमानच्या आरमाराने पोर्तुगिजांचा थेट वसईच्या कोटा पर्यंत मुलुख उध्वस्त केला...”
शिवाजीराजे ही जमिनीवरून पोर्तुगीजांवर हल्ला चढविण्याच्या तयारीत आहे त्यामुळे पोर्तुगीज फारच पेचांत सापडल्याने संकटात पडले आहेत तसे पहिले तर अरबांनी तहाच्या अटी पाठविल्या पण त्यांचा इन्कार केल्याने पोर्तुगीजांची हि आपत्ती ओढवली आहे ४०० आरबी सैनिक किनाऱ्यावर उतरून वसईच्या कोटा पर्यंत त्यांनी बरीच नासधूस केली आहे बरेच चर्च, गावे आणी शहराची जाळपोळ केली पोर्तुगीज त्यांना तोंड देण्यास धजावले नाहीत.. मस्कती सैन्य ५ दिवस राहून लूट करून मस्कतला निघून गेले त्यामुळे प्रोतुगीजांची फार नाचक्की झाली आहे...

No comments:

Post a Comment