Followers

Saturday 15 May 2021

बहादुरवाडी भुईकोट...बहादुरगढी

 बहादुरवाडी भुईकोट...बहादुरगढी



पहिली कथा अशी आहे कि, सुमारे ३५० वर्षापुर्वी आदिलशाहीचा ४०००० सुवर्णहोनांचा खजिना विजापुरकडे चालला होता. खजिन्याच्या संरक्षणासाठी सैन्य असुनही तो खजिना चोरांनी लुटून नेला.या घट्नेची चौकशी करण्यासाठी आदिलशहाने अंमलदार पाठविला. त्याने हि चोरी जिथे झाली त्या जागेच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीच हि जागा आपली आहे हे कबुल करेना, कारण तसे झाले असते तर सरकारी खजिन्याची रक्कम भरुन द्यावी लागली असती. अखेरीस महिपतराव घोरपडे यांनी हि जागा त्यांच्या मालकीची केल्यास चोरीची रक्कम सरकारात भरण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेही माळरानच द्यायचे असल्याने आदिलशहाची परवानगी मिळाली आणि सव्वा नउ चावर ( १२० बिघा ) माळरानाची देशमुखी घोरपडे यांच्या नावावर झाली.महिपतरावानी बादशहाला चाळीस हजार सुवर्णहोन दिले आणि या माळरानावर गाव वसविले. वाडा बांधुन स्वता तिथे वस्ती केली आणि कोटाभोवती खंदक काढला. नव्या गावाचे नामकरण झाले "बहादुरबिंडा". महिपतरावांना कुस्ती, कसरती, आखाडे याची आवड होती म्हणुन "बहादुरबिंडा सवाई आखाडा" अशी लावणी कलगीतुरे वाल्याने केली. पुढे या गावाचे नाव बहादुरवाडी झाले.
तर ब्रिटीशकालीन गॅझेटियरच्या मताप्रमाणे हा भुईकोट माधवराव पेशव्यांनी कोल्हापुरकर भोसलेंच्या आक्रमणापासुन सातारा गादी व कोल्हापुर गादी यांच्या सीमेवर म्हणजे वारणा नदीकाठी संरक्षणासाठी बांधला आणि तो मिरजकर पटवर्धनांच्या ताब्यात दिला. त्यांनी मुधोळकर रामचंद्रराव महिपतराव घोरपडे यांना तेथे नियुक्त केले.करवीर रियासतीच्या एका पत्रात करवीरकर छत्रपतींनी बहादुरगड पाडून टाकण्याची आज्ञा दिली होती.
बहादुरवाडी गाव कोल्हापुरच्या ईशान्येला ७० कि.मी. वर तर ईस्लामपुरच्या आग्नेयेला ३५ कि.मी. वर आहे. ईथे जायचे झाले तर पुणे -बेंगळुरू महामार्गावर पुण्यावरुन कोल्हापुरच्या दिशेने जाताना, पेठ गाव ओलांडल्यानंतर डावीकडे मल्लिकार्जुन किंवा विलासगडाचा डोंगर दिसु लागतो. तो ओलांडल्यानंतर तांदुळवाडी हे गाव लागते. यानंतर डाव्या हाताला बहादुरवाडी गावाचा फलक दिसतो. इथुन डांबरी सडक थेट बहादुरवाडी गावापर्यंत गेली आहे. गावाच्या शेवटी भुईकोट उभा आहे.
माहिती : इंटरनेट
बहादुरवाडी भुईकोट...बहादुरगढी

No comments:

Post a Comment